Posts

Showing posts with the label Spirituality

महाशिवरात्री | Mahashivratri

Image
 आज महाशिवरात्री ....  नक्कीच फराळ काय काय करायचा या उपवासादिवशी याचे नियोजन केले असेलच पण त्या बरोबर या दिवसाचा उपयोग आपण आध्यात्मिक उन्नती करिता याचे जास्त महत्व आहे.  शिव शंकराचे मंदिरे जर आपण पाहिली असतील तर अतिशय गूढ निसर्गरम्य ठिकाणी उंच डोंगर अथवा अरण्य अशा नैसर्गिक शांत ठिकाणी असतात जेणेकरून येणारा भाविक मनाला शांतता लाभून आनंदाची , समाधानाची अनुभूती घेऊ शकतो. भारतातील ज्योतिर्लिंगच नाही तर इतरही स्थानिक ठिकाणी ही मंदिरे नदी, तलाव अशा जलाशयाकाठी आढळतील. इतर देवी-देवतांच्या मंदिरात दिसणारा झगमगाट त्यामानाने आपणास दिसत नाही कारण महादेव हे विरक्त आहेत.  नेहमी फोटो मध्ये दिसणारी महादेवाची पोज म्हणजे सदैव ध्यानस्थ ! हे कशाचे एवढे ध्यान करतात ते देवी पार्वतीने एकदा विचारले आणि ज्या दिवशी याची माहिती दिली तो हा महाशिवरात्रीचा दिवस. शिवतत्व या दिवशी जास्त प्रमाणात प्रसारित होत असते ज्याचा जास्तीत जास्त उपयोग आपण आपल्या साधनेकरिता केला पाहिजे.  सध्या विदेशामध्ये ध्यान हा तेथील अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे. ध्यानाचा काय फायदा होतो याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास ...

4 useful tips of Bhagvadgita in Marathi | सांगेन गोष्टी युक्तीच्या चार

Image
 आज गीता जयंती आहे ....  साधारण ५००० वर्षांपूर्वी श्रीकृष्णाने अर्जुनाला भर युद्धाच्या वेळी कुरुक्षेत्रावर सांगितली आणि महर्षी व्यास यांनी महाभारत ग्रंथात ती लिहिली. एवढा इतिहास सर्वसाधारणपणे आपल्याला माहित असेलच पण इतकी वर्षं उलटून देखील या मधील गोष्टींचे महत्व अबाधित आहे हे विशेष . खरंच असे आहे की आपली नेहमीची या डिजिटल युगातील सवय की त्या दिवसापुरते लै भारी म्हणले की झाले असे तर वाटू शकते. तर पाहुयात आत्ताच्या जमान्यात या गीतेचा रेलेव्हन्स कसा आहे ते. हि साधारण त्या हत्ती आणि आंधळ्यांची गोष्टी सारखे आहे multidimensional . तर पाहू आपल्या हाताला काय लागते ते  सर्वप्रथम यातले पहिले पात्र आहे अर्जुन , ज्याच्यामुळे हे तत्वज्ञान श्रीकृष्णाने सांगितले.  १ तर असा हा अर्जुन सामान्य माणूस थोडीच होता आजच्या भाषेत सांगायचे तर G.O.A.T. ( ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम ) असा महारथी होता  २. ज्याने  एकट्याने सर्व कौरवांना या कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या काही काळ आधी  हरवले होते. ३ सर्व अस्र -शस्र  यांची माहिती असलेला   ४ अक्षय बाणांचा भाता असणारा सव्यसाची होता...